खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

अपयश म्हणजे अनुभवाच्या शाळेत मिळालेला प्रवेश!

अपयश आले कि एकेक , निरनिराळे , चित्रविचित्र , अपेक्षित , अनपेक्षित असे सर्वच अनुभव यायला सुरुवात होते अन आपण हुशार व्हायला लागतो , किंबहुना शहाणेच होतो, त्याहीपुढे म्हणायचे झाले तर अक्कलच विकत घेतो ! भोवतालचे बदलू लागले कि मग पूर्वी योग्य वाटत (भासत ) असलेल्या बहुतांश बाबी हळूहळू चूक कशा होत्या ते लक्षात यायला लागते आणि 'ती चूक पुन: नको रे बाबा ! ' अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येते .
अपयशामध्ये सचोटीचा काळ असतो आणि अशा दिवसांमध्ये कसोटी फक्त आपलीच लागते असे नाही तर कसोटी लागते ती खऱ्या आणि खोट्याची ! त्यामुळे चिंता कशाला करायची ? अडचणीच्या काळामध्ये मी मी म्हणणारे मुखवटे दिसतात , त्यांचा खरा चेहरा समोर येतो आणि खोटे समजलेले लोक जेव्हा पुढे होऊन अगदी निरपेक्षपणे मदत करून जातात तेव्हा त्यांचे खरे मन आपल्याला दिसून येते , त्यामुळे अपयशी माणसाजवळ काही असो वा नसो एक गोष्ट मात्र असते , अपयशी माणसाजवळ शिदोरी असते अनुभवांची आणि त्या अनुभवांमुळे आलेल्या शहाणपणाची. अशी हि अपयशाची तऱ्हा आणि असा हा अपयशातून उदभवलेला खऱ्या परीक्षेचा काळ ! त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता पाहा आणखी काय काय शिकायला मिळतंय ते ! कारण शेवटी अपयश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अनुभवाच्या शाळेत मिळालेला एक प्रवेशच आहे.

Comments