खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

मातीमोल


अपयशामध्ये आपली होणारी अवस्था आणि त्यातून आपण कसे वागायला पाहिजे हे सांगणारी मराठी ब्लॉग पोस्ट.
मातीमोल

सोने आणि लोखंड दोहोंसारखे जे-जे काही धातू आहेत ते जमिनीतूनच मिळत असतात, मातीच्या तुलनेत त्यांच्यामध्ये असलेला भरीवपणाही तितकाच असतो आणि कदाचित त्यामुळेच त्यांचे वजनही मातीच्या तुलनेत तेवढेच आणि कितीतरी जास्त असते शिवाय जवळपास सर्वच धातूंना एक विशिष्ट किंमत हि असते. या तुलनेत आपण 'माती' कुठूनही उचलून आणू शकतो तिची किंमत आपल्याला कोणीच मागत नाही. त्यामुळे माती आपल्याला फुकट मिळत असल्यामुळे तिची काही किंमतच नाही असे वाटण्याची शक्यता असते. त्यामुळेच 'मातीमोल' झाले म्हणजे ते धुळीस मिळाले किंवा त्याचे अस्तित्व संपले किंवा त्याची काहीही किंमतच शिल्लक राहिली नाही असा एक समज आपला असतो. आपल्यासोबतचे यशस्वी सोबती पाहता काही अंशी हि गोष्ट खरीही आहे - म्हणजे जेवढा भाव यशस्वी माणसाला मिळत असतो तेवढा भाव अपयशी माणसाला मिळत नाही - म्हणजेच जेवढा भाव धातूंना मिळतो तेवढा भाव मातीला मिळत नाही असेच काहीसे! परंतु याबाबतीत विचार करता - जेव्हा धातू हे अग्निमधून जात असतात तेव्हा ते वितळत असतात आणि त्यांचे पाणी होते आणि जेव्हा माती हि सुद्धा अग्निमधून जात असते तेव्हा मात्र ती वितळत नाही आणि तिचे पाणी होत नाही; याउलट ती अधिक खणखणीत आणि टिकाऊ होत असते आणि नेमका हाच गुणधर्म आपण मातीचा जेव्हा आपण अपयशी किंवा मातीमोल होत असतो तेव्हा गृहीत धरायला पाहिजे! शिवाय (मातीचा) आणखी एक 'निर्मितीचा' आणि जन्म देण्याचा गुणधर्म आहेच कि! म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही मातीमोल व्हाल त्या त्या वेळेस एक नवीन अंकुर तुमच्या मधून फुटू शकतो हेही विसरता काम नये! म्हणजे ज्या ज्या वेळेस आपली अवस्था काहीच किंमत नसल्यासारखी झालेली असेल तेव्हा निराश न होता अशा 'मातीमोल' अवस्थेत काहीतरी आणून पेरायचे आणि ते उगवायची वाट पाहायची आणि त्याच पुढील अंकुरांना खतपाणी घालत घालत स्वतःही मोठे व्हायचे!

मला स्वतःला केव्हा केव्हा अपयशी झाल्यासारखे जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा तेव्हा खूप खेद वाटतो; परंतु पुन्हा दुसऱ्या प्रयत्नाला/कामाला लागावेत लागते! यातूनच मातीमोल झालेल्यांची काय अवस्था होत असेल हा विचार मनामध्ये आला आणि ते किती खचत असतील याची भ्रांत मनामध्ये निर्माण झाली, त्यातूनच वरील दुसरा विचार हि आला आणि तोच शेअर केला.


Comments

  1. खूप छान व प्रेरणादायी लेख

    ReplyDelete

Post a Comment

कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.